समुदाय-आधारित संवर्धन (Community-based conservation ) आणि महाराष्ट्रातील कोळीवाडे- भाग १ दि ६ एप्रिल २०१९ आपण सर्वांनी खुप आनंदाने गुढीपाडवा सण साजरा केला. पण या नववर्षांच्या सुरुवातीपासून आपणं तमाम मासेमारी समाजाने कित्येक संकटाना तोंड द्याल सुरवात केली आहे. समुद्रात आधीच कमी होत जाणारी मत्स साठ्याची संख्या, त्याचं बरोबर गोराई, उत्तान, पालघर , वसई या भागात होत असलेली ONGC ची समुद्रात तेल साठ्याची शोधासाठी होत असलेली मोहीम आणि त्यामुळे आलेली मासेमारी वर आलेली बंधन, मोठ्या प्रमाणात होत असलेली विकास कामे जसे की समुद्री मार्ग (Coastal Road). कारण काही असो पण यात आज भरडला जातो तो साधारण कोळी समाज आणि आपली मासेमारी. यापूर्वी आपण कित्येक नेते आणि राजकीय पक्षांना आपली समस्या सांगितली परंतु आज पर्यंत कधीच कोणत्याच प्रश्नांना योग्य दाद नाही मिळाली. विकास कामांना विरोध करून कधीच आपण खात्रीलायक यश नाही मिळवू शकलो. परंतु जगभरात अशी कित्येक उदाहरण आहेत की जिकडे समुदाय-आधारित संवर्धन करून खुप मोठया प्रमाणात एखाद जंगल, पाणथळ जागा, माळरान वा समुद्री किनारी सापडणारा जीव सृष्टी. आणि या प
Posts
Showing posts from April, 2019
- Get link
- Other Apps
आठवणी आणि मी कित्येकांणा खुप सोप असत आयुष्यात बरच काही विसरुण जाण हरवलेला श्वास आणि बैचेनीचा ध्यास मंतरलेले ध्येय आणि मनाचे पाश आठवणी या आशा असतात जणू सतत फडफडणारे झेंडे माळरानाचे कोणी येवो न येवो पाहावयला मातीमध्ये रोवलेले आणि वाऱ्यापाशी जोडलेले डोंगरावरच्या देवळामध्ये आता रोज होते गर्दी देवालाही माहीत आहे येथे कोणी नाही दर्दी आगरबत्तीचा पुडा आणि उद धुपाची आरती मन हरवलेल्या माणसांची नित्याची ही खोगीरभारती संपुन जावो हा जन्म तुटो हे श्वास आभास आता महानिद्रेचा विश्रांतीचा ध्यास स्वप्ननाच्य दुनियेवरतीअंतिम सत्याची मात आठवणीच्या या सागराला आता देईल मी साथ - प्रदिप ना चोगले टीप- २०१६ मध्ये मी हि कविते ची रचना केली. आपली प्रतिक्रिया नकीच कळवा.