Posts

हवामान बदल _ भाग १

  त्रयी हवामान बदल, सागरी आधीवास आणि अंदमान-लक्षद्वीप बेट समूह यांची      ‘हवामान’ आणि ‘हवामान बदल’  या दोन्ही गोष्टी बद्दल आपण बऱ्याच वेळा बोलत असतो पण बहुधा आपण त्यात गल्लत करतो. या लेखाच्या सुरुवातीलाच आपण यातील भेद समजून घेऊया.     हवामान (Weather) म्हणजे एका विशिष्ट वेळी आणि ठिकाणी असलेल्या वातावरणाची स्थिती होय. यामध्ये तापमान, पाऊस, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाश यांसारख्या स्थितींचा समावेश होतो.  हवामान ही वातावरणाची अल्पकालीन स्थिती दर्शवते, जी काही मिनिटांपासून ते दिवसांपर्यंत कधीही वेगाने बदलू शकते(जागतिक हवामान संघटना (WMO). उदाहरणार्थ - आज पुण्यात २५°C तापमानासह जोरदार पाऊस पडत आहे.   हवामान बदल म्हणजे हवामानाच्या स्थितीतील असा बदल, जो त्याच्या गुणधर्मांच्या सरासरीमधील (mean) आणि/किंवा परिवर्तनीयतेमधील (variability) बदलांद्वारे ओळखला जाऊ शकतो (उदा. सांख्यिकीय चाचण्या वापरून) आणि जो दीर्घकाळापर्यंत, सामान्यतः दशके किंवा त्याहून अधिक काळ टिकून राहतो. हवामान बदल हा नैसर्गिक अंतर्गत प्रक्रिया किंवा सौर चक्रातील बदल (modu...

Use of blue whale acoustics for finding the ocean secrets

 Date 21/03/2026 Learning from a webinar Today on 21st March 2026, in the evening between 7:30–8:45, I got an opportunity to attend a webinar on ‘Movement ecology and conservation of blue whale in the central California current ecosystem’, which was delivered by Dr. John Ryan from Monterey Bay Aquarium Research Institute (MBARI) and organized by the Marine Mammal Research & Conservation Network of India (MMRCNONOI).   After a long time, I successfully attended this full live webinar from start to end. Overall, this webinar was impressive to listen to and learn inside about blue whale research, which was more focused on a few important topics, including coastal upwelling, low frequency sound, krill, bimodal distribution and their foraging call, D-Call, and bio-logger or tag for blue whale.   Coastal upwelling is an oceanographic concept which means that because of the wind, the dense, colder and nutrient-rich water from the bottom of the ocean moves from bottom to surf...

कासव संवर्धन _ भाग २

Image
 महाराष्ट्रातील समुद्री कासव संवर्धनाची मागील पाच वर्षांपर्यंतची रंजक सफर   समुद्री कासवे हे आपल्या महासागरांचे प्राचीन रक्षक आहेत. सागरी परिसंस्थेचे संतुलन राखण्यात ते  महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु,  आपल्या समुद्रातील हालचाली मुले त्यांचे अस्तित्व मोठ्या  प्रमाणात धोक्यात आले आहे. १९८१ ते २०२१ या कालावधीतील या बाबत काय घडले हे प्राची आणि इतर संशोधक मंडळी याने २०२३ मध्ये एका पुनरावलोकन शोधनिबंधा द्वारे प्रकाशित केले आहे. त्या आधारे येथे आपण समजून घेऊया या कालावधीत कासव संशोधन आणि संवर्धन या बाबत संक्षिप्त तपशील. या अभ्यासांनी अरबी समुद्रातील पाण्यात समुद्री कासवांच्या पाच प्रजाती आढळतात असे दिसून आले.  ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉक्सबिल, लॉगरहेड आणि लेदरबॅक. यापैकी, ऑलिव्ह रिडले ही सर्वात जास्त दिसणारी प्रजाती आहे, जी कोंकण पट्ट्यात घरटी बनवण्यासाठी ओळखली जाते. संशोधनाने समुद्री कासवांच्या मृतदेह किनाऱ्यावर येण्याच्या (स्ट्रँडिंग) प्रसंगात लक्षणीय वाढ दाखवली आहे. २०१७ ते २०२१ या कालावधीत, महाराष्ट्रात अशा प्रसंगांची वारंवारता जास्त होती, २०१८ (६२ प्रसं...

कासव संवर्धन

Image
 महाराष्ट्रातील कासव संवर्धन कार्यातील लोकसहभाग आणि संशोधन वाटचालीचा मागोवा   कासव मित्र आणि कासवांचे गाव म्हणून आज ‘वेळास’ ची ओळख महाराष्ट्रातच नव्हे तर सपूर्ण विश्वात गाजत आहे. पण कशी झाली याची सुरवात याचा सिंहावलोकन करणे पण अतिशय रंजक आणि प्रेरणादायक आहे. या लेखाच्या माध्यमतून आपण समजून घेण्याचा प्रयत्ण करूया कासव संवर्धनची चळवळ आपल्या राज्यात कशी सुरू झाली त्या बद्दल.      महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले (olive ridleys) जातीच्या सागरी कासवांचे घरटे अधूनमधून आढळून येत असले तरी, या जीवांना मानवी आणि नैसर्गिक दोन्ही प्रकारच्या धोक्यांचा सामना करावा लागत होता. अंड्यांची आणि प्रौढ कासवांची चोरी (poaching), मासेमारीच्या जाळ्यांमध्ये (fishing nets) अडकून होणारा मृत्यू (incidental catch), आणि किनारपट्टीवर होणारी विकासकामे हे महाराष्ट्रातील सागरी कासवांसाठी प्रमुख धोके ठरले होते. विशेषतः, मानवाद्वारे होणारी चोरी आणि कोल्ह्यांकडून (Canis aureus) अंड्यांचे भक्षण केल्यामुळे (predation) कासवांच्या घरट्यांची संख्या सातत्याने कमी होत होती.  या गंभीर परि...

आनंदाचे शोध यात्री _३

Image
   भारताचे ‘टर्टल मॅन ऑफ इंडिया’ : सतीश भास्कर - एका दुर्दम्य प्रवासाची गाथा    भारतातील सागरी कासवांच्या (Sea Turtles) संवर्धनाची खऱ्या अर्थाने सुरुवात ज्यांच्यामुळे झाली, त्या सतीश भास्कर यांचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचा जन्म ११ सप्टेंबर १९४६ रोजी झाला आणि २२ मार्च २०२३ रोजी त्यांचे निधन झाले. सतीश भास्कर हे मूळचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मधील एक शांत पण उत्साही तरुण होते.   ७० च्या दशकाच्या सुरुवातीला, चेन्नईजवळील मद्रास स्नेक पार्क (Madras Snake Park) हे अनेक अशा विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र होते, ज्यांना पारंपरिक महाविद्यालयीन शिक्षणाचा कंटाळा आला होता. सतीश हे याच गटातील होते आणि त्यांची आवड होती की ते दररोज सकाळी अनेक किलोमीटर धावून एलियटच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहायला जात असत. त्यांना समुद्राची इतकी आवड होती की त्यांचे वसतिगृहातील मित्र त्यांना खासगीत 'अक्वामॅन' (Aquaman) म्हणत असत. संधी साधून, आयआयटीच्या अभ्यासक्रमातून मन विचलित झालेल्या सतीश यांनी क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. मद्रास स्नेक पार्कने त्यांना फील्ड ऑफ...

आनंदाचे शोध यात्री _२

Image
  आर्ची कार: एका समुद्री कासव संशोधकाचा जागतिक विचार प्रसार आर्ची कार हे अमेरिकन दिग्गज समुद्रकासवा-तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. पण त्यांच्या विचारांचा प्रभाव केवळ अमेरिकेपुरताच मर्यादित नव्हता. विज्ञान आणि साहस यांचे मिश्रण असणाऱ्या त्यांच्या सशक्त लेखनाने जगभरातील वाचक मंडळीना भुरळ पाडली आहे ज्यामुळे त्यांची  पुस्तके डझनभर भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. जी आज देखील बऱ्याच निसर्ग अभ्यासकाना प्रेरणा देतात.    एका अलीकडील संशोधन प्रकल्पात कार यांच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीची संपूर्ण कहाणी उलगडून समोर आली आहे, ज्यात त्यांच्या जगभरात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची ही पहिलीच यादी तयार झाली आहे.   आर्ची कार यांना फार मोठी देणगी होती ती म्हणजे लेखनाची. ते फक्त तथ्ये सांगत नसत. समुद्र किनारी दुपारच्या वेळी जर आपण गरम वाळू वर चालू लागलो तर जशी ती उबदार वाळू आपल्याळ स्पर्श करते किंवा रात्री सागर किनारी गस्त घालणाऱ्या कासव मित्राला मादी कासवाची पाऊलवाट (फ्लिपरवाट) ज्या पद्धतीने आनंदाचं दान देते अगदी त्या प्रमाणे कार यांचे लेखन आहे. जे वाचताना आपल्याला आपण ते वाचत नसून प्रत्यक्ष...