Posts

Showing posts from 2020

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग २

Image
नियोजन शून्य पद्धती मुळे मासेमारी करताना जे अनावश्यक रित्या जाळ्यात पकडले जाते वा फेकले जाते अश्या सगळ्या सागरी संसाधनाचा अंतर्भाव कुटा वा Bycatch या परिभाषेत करता येईल हि गोष्ट आपण मागील लेखा मध्ये समजून घेतल्यावर आता पुढे आपण समजून घेऊ की सागरी सस्तन प्राणी (देवमासे व डॉल्फिन ई..), सागरी पक्षी आणि समुद्री कासवे याची यात काय वताहत होते.   जगभरात अथांग पसरलेल्या सागरी क्षेत्रात सात समुद्री कासव प्रजाती आढळून येतात. ऑलिव रीडले, लेदर-बॅक, सी ग्रीन, लॉगर हेड आणि हॉक्सबिल या पाच सागरी कासाव प्रजाती भारतीय मुख्य भूमी चे समुद्री किनारे, सागरी प्रदेश, मुख्य बेटे आणि खाडी तसेच नदीच्या जवळ असल्याची शास्त्रीय अभ्यास नोंदी आहेत. कॅम्प रीडले आणि फ्लॅट बॅक समुद्री कासवे याची खात्रीदायक नोंदी अजून आपल्या येथे झालेल्या नाही आहेत परंतु जगभरात इतर भागात मात्र ही समुद्री कासवे विपुलतेने आढळून येतात. समुद्री कासवे ही सागरी अधिवासात खूप महत्वाची भूमिका बजावतात. सागरी वनस्पति आणि शैवाल याचे बिजप्रसरण, पाठीचा कणा नसलेल्या कित्येक लहान मोठे सागरी जीव हे देखील फार मोठा पल्ला या कसवयांच्या मदतीने पार पाड...

निळ्या देवमास्याच्या मार्गावर :- भाग १

Image
  निळ्या देवमास्याच्या मार्गावर     निळाशार पसरेलला दर्या राजा आणि त्याच्या लाटांवर हिंदोले खात कधी पुढे कधी थोडे मागे असं मार्गक्रमण करणाऱ्या कोळयांच्या बोटी असं दृश्य आपण सर्वानी पहिलं असेल. किनाऱ्यावर शांत पणे उभे राहून वा नारळी-पोकळीच्या बागेत मस्त पणे वाळूत बसून असं दृश्य पाहण हा एक नयन सुख देणारा अनुभव. परंतु याच निळ्याशार दर्या राजाच्या अंतरंगात काय काय आहे हे जर आपण अभ्यासू लागलो तर बुद्धी स्तंभित होईल अशी विविध प्रकारची जैव विविधता आणि नानाविधी नेसर्गिक साधने त्याच्या पोटात दडलेली दिसून येईल. दोस्तहो आज या लेख मालिकेच्या माध्यमातून आपण समजून घेऊ की या मासेमारी आणि जैवविविधता मध्ये असलेला सहसबंध. कश्या स्वरूपात या महासागरात विचरण करणारे अजस्त्र जीव आपल्या दैनंदिन जीव विशेष आहार- विहार सवयी प्रमाणे महासागरी अन्नसाखलीत महत्वपूर्ण भूमिका बजावतात. त्याच बरोबर मासेमारी करताना आपण कश्या स्वरूपात सकारात्मक वा नकारात्मक रित्या या अजस्त्र जीवांवर परिणाम करतो.   अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी जीवनाच्या मूलभूत गरजा आहेत. यातील वस्त्र आणि निवारा ही गोष्ट व्यक्ति ...
Image
गणपती  बाप्पा  - एक सांस्कृतिक प्रतीक निसर्ग संवर्धकाचं    आज दिनांक २२/०८/२०२० अर्थात भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच  आपली लाडकी श्रीगणेश चतुर्थी. यंदा फेब्रुवारी महिन्यापासून जे कोरोना रुपी संकट उभ्या जगतावर चालून आले आहे त्या दुःखा पासून जणू आपणांस हे दुःखहर्ता हे नामाभिमान पूर्ण करण्यासाठी बाप्पा आपल्या घरी आला आहे. आपण कितीही निसर्गावर मात करू अशी भाषा बोलली आणि प्रगती केली तरी आज आपणांस कळून चुकलं आहे कि निसर्ग हाच खरा गुरु आहे. एक छोटासा, डोळ्यांनी हि न दिसणारा विषाणू उभी मानव जातीची गती बंद करू शकतो यावरून आपण या निसर्गा समोर किती खुजे आहोत हे आपणांस समजून चुकले आहे.    आपण समुद्राला मागे सारून त्यात मुबंई आणि यांसारखी कित्येक महानगरे उभारली, जंगल आणि डोंगर  पोखरून महामार्ग आणि स्मार्ट सिटी वसवल्यात. नदीवर मोठाले धरण बांधून कित्येक गाव आणि  जैवविविधता संपन्न अधिवास नष्ट केले. निसर्ग हे सर्व निमूटपणे कित्येक शतके सहन करत होता. पण २०१० पासून तो आपली भूमिका मांडायला लागला. निसर्ग आपली मत व्यक्त करतो तेव्हा आपण हवालदिल हो...
Image
राम  भूत्वा  राम   यजेत प्रभू रामचंद्र हे माझ्यासाठी आणि बहुसंख्य भारतीयांसाठी सगुण  साकार रूपात अवतरलेले ईश्वरी अवतार आहेत. इतर काही  जणांसाठी ते आदर्श मनुष्य आहेत तर कोणासाठी रामप्रभू हे विविध मत आणि विचार धारणेसाठी अभ्यासन्याण्याजोगी  गूढ असा विषय  आहे. एक मात्र खरं आहे कि बहुसंख्य भारतवासियांसाठी ते एक प्रेरणा आहेत. ज्यांच्या जीवनचरीत्राच्या प्रतिबिबं स्वरूपात आपण 'रामायण' हे महाकाव्य ऐकतो, पाहतो, वाचतो अशी अदभूत चरित्र मुर्ती म्हणजे श्री राम प्रभू.    आजचा दिवस हा माझ्यासाठी आणि त्या प्रत्येक भारतीयांसाठी   महत्वपूर्ण आहे कारण हजारो वर्षांपासून सर्वांच्या मनात वसलेल्या  प्रभू रामचंद्राचं मंदिराची आज पायाभरणीची पहिली वीट रचली जाते.    ' कृष्ण भूत्वा कृष्ण यजेत  शिवम भूत्वा शिवम यजेत राम भूत्वा  राम   यजेत  ' या नियमानुसार आपण ज्या गोष्टीच ध्यान करतो तसे होऊन जातो म्हणून आपण आज या शुभ दिनी राम चरित्राचा स्मरण करूया आणि आपल्या जीवनाला राममय बनवूया.   श्री...
Image
Narali Purnima - Festival to express gratitude toward the ocean               सन आयला गो आयला गो नारळी पुनवेचा               मनी आनंद झालं कोळयांच्या दुनयेला..   This line from the most popular koligeet( song of the fisherman community of Maharashtra). when the monsoons time was over and condition was good for catching fish in ocean 'Narali Purnima' festival on this occasion celebrated throughout the coastline of Maharashtra. preparing delicious food mad by coconut is the main food cousin that day. People in the fisherman community wearing traditional cloth and celebrating this festival with friends and family. To express deep gratitude toward the ocean for the upcoming fishing year and pray for good health and life. This type of festival helps us to maintain the fish resources and developed a healthy approach for marine conservation.    As per the 1972 Wildlife protection act, we ...
Image
  सागरी मत्स्य संपत्तिची वामन कथा - भाग १    भारतीय संस्कृतीत प्रसिद्ध असलेली दशावतार संकल्पना आणि कथा माहीत नसेल असे व्यक्तिमत्व कोणी अभावानेच असेल. या दशावतारात एक अवतार फार लोभस आहे पण जेव्हा ते आपली परिसीमा गाठते तेव्हा त्याची व्याप्ती मात्र अमर्याद होत जाते. वामन अवतार म्हणजे वरकरणी पाहता एक छोटं बालक रूप पण जेव्हा हाच वामन रूप धारी भगवंत बळी राजाकडे तीन पाऊले जमीन मागतो तेव्हा सुरवातीला नाजूक आणि इवलेसे भासणारी पाऊले तिन्ही लोक व्यापतात.      पाचवे अवतार  बळीच्या द्वाराला जासी         भिक्षे स्थळ मागुनी बळीला पाताळी नेसी       आरती गाताना आपण हे पद नेहमी गातो परंतु या अवताराची तशी सर्वसामान्य जनमानसात प्रसिद्धी नाही. असो या लेखाच्या माध्यमांतून मत्सव्यवस्थापन आणि नियोजन शाखेतील एक व्यापक शास्त्रीय गोष्ट आपणांस समजावून सांगताना या वामन रुपाची कृतज्ञता पूर्वक आठवण करणे इथे खूप उपयुक्त आहे.    ज्याप्रमाणे सुरवातीला खूप लहान भासणारी तीन वामन पाऊले...
Image
नाविण्यपूर्णतेचा ध्यास ‘ चिरंतन महासागर ‘ जपण्यासाठी   विकासाच्या वाटेवर चालत असताना मानवी समाज नेहमी खूप मोठ्या जलस्त्रोता काठी स्थिरवलेला दिसून येतो. मग कधी ही मानवी सभ्यता मोठ्या नदी किनारी विकसित होते तर कधी मोठी शहरे ही समुद्र किनारी विस्तारलेली दिसतात. ठिकाण नदी असो ओढा असो की खाडी वा समुद्र किनारा ‘पाणी’ ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे ज्या भोवती आपले वाड-वडील, आपण आणि आपली येणारी पिढी वास्तव्य करणार आहे. मानवी शरीर असो की इतर कोणी सजीव पेशी साधारण ६०-८०% ही पाण्याने व्याप्त असते; प्रमाणात पेशी आणि प्रजाती प्रकारानुसार फरक दिसून येतो परंतु ‘पाणी’ हा घटक खूपच महत्वपूर्ण हे काही कोणाला नाकारता येणार नाही.   शाळेत प्रवेश केल्यावर तिसरी किंवा चौथी ला  आपण एक महत्वपूर्ण गोष्ट विज्ञान आणि भूगोलाचा अभ्यास करताना शिकतो ती म्हणजे ‘जलचक्र’ अर्थात जमिनीवर असलेल्या पाण्याची उष्णतेने वाफ होते ही वाफ थंड झाली की त्याचे ढग बनवतात, ढग थंड होऊन जेव्हा जड होतात तेव्हा पाऊस पडतो. शाळेत शिकत असताना आपण एक इयत्ता पास होतो आणि पुढच्या वर्गात सरकत असतो. जलचक्र...