सागर कथा~ मैफिल समाज रचनेची आणि मासेमारी दि ३१/१०/२०१९ पासून माझा प्रवास सुरु झाला. रात्री ०९ वाजता मुबंई-चिपळूण गाडीने याची सुरुवात झाली. उलघडायचं होत सुंदर कोकण आणि तेथील लोक जीवन. सुंदर स्वच्छ समुद्री किनारे, भरभरून पसरलेला निसर्ग यांच्या सोबत होणारी मासेमारी आणि इतर सागरी दुवे यांचा अभ्यास करण्यासाठी मी हि मुसाफिरी करत होतो. यातील एक पैलु म्हणजे इकडचं समाज जीवन जवळून अनुभवणे. १० दिवसा पूर्वीचं महाराष्ट्रात आमदारकीच्या निवडणुका पार पडल्या होत्या सर्वत्र जात आणि धर्म या आधारावर माणूस रंगा मध्ये विभागला होता. कुठे भगवा रंग अधिक भरून होता तरी कुठे निळा रंग विखुरला होता मध्येच एखादी हिरवी छटा दिसून येत होती. थोडं वाईट वाटलं की अजून हि या एवढ्या मोठ्या लोकशाही देशात जात आणि धर्म यांमध्ये होता. असो निवडणुका आल्या आणि गेल्या परंतु जी गोष्ट मुबंई नगरीत मनाला त्रास देत होती इथे कोकणात मात्र या बद्दल परिस्थिती वेगळी होती. प्रवासाच्या सुरवातीपासून अगदी चिपळूण ला उतरेपर्यंत या भेदाभेदाच्या सीमा विरघळून जात होत्या. मुबंई-गोवा महामार्ग म्हणजे प्रचंड खडे आणि धूळ...