अनुभूती अद्भुत सृजनाची - कैलास मंदिर आणि औरंगाबाद काही गोष्टी अश्या असतात ज्या बद्दल आपण कितीही बोललो तरी अनुभवाशिवाय ती गोष्टी कशी हि समजू शकतच नाही. असा एक अनुभव 'याची देही याची डोळा' वेरूळ ची जैन लेणी आणि कैलास मंदिर पाहणे. खूप वेळा काही गोष्टी आपण न ठरवता अनुभवतो तसाच हा प्रवास अनुभव. साधारण वर्षभर काम केल्याचा क्षीण कमी करण्यासाठी आणि मैत्रीची गोडी वाढवणायासाठी केलेला सुंदर प्रवास. शुक्रवारी कामाचे तास संपून रात्रीच जेवण उरकल्यावर आम्ही सर्व दोस्त एक खाजगी गाडी करून औरंगाबाद साठी मार्गस्थ झालो. आठ तास लागतील असा अंदाज होता परंतु मुबंई पासून सुरु झालेला पाऊस आणि खराब रस्ता या कारणाने हा प्रवास १२ तास खर्च करून पूर्ण केला. सकाळची पोटपुजा करून तडक दौलताबाद चा किल्ला गाठला. १२ व्या शतकात बांधलेला हा एक अजस्त्र किल्ला यादव राजवटीची याद ताजी करतो. यादव राजवटीतील भिल्लमा-२ पासून सुरु झालेला प्रवास १५ व्या शतकापर्यंत विजापूरच्या आदिलशाही पर्यंत पोहचतो. पुढे १७ शतक उजडेपर्यंत मुघल बादशहा औरंगजेब चे वास्तव देखील अनुभवणारी हि वास्तू. १९५१ मध्ये या ऐतिहासिक वास्तू ल
Posts
Showing posts from September, 2019
- Get link
- Other Apps
अनंत चतुर्दशी - अनुभूती अनंत आनंदाची.... सर्वांना गणरायाच्या आगमनाने खूप आनंद झाला आहे, सर्वत्र उत्साह आणि प्रसन्नतेच वातावरण आहे. मोरया आपल्या घरात गेल्या १० दिवसापासून आला व आपल्या सोबत राहिला. पाहुणचार घेऊन बाप्पा आता निघण्याच्या तयारीला आहे. "जाऊ नको रे गजानना दुःख वाटते माझ्या मना" अशी मनाची सर्वत्र अवस्था झाली आहे. याच निमित्ताने आजचा हा लेख मी ऐका वेगळ्या दृष्टिकोन समोर ठेऊन लिहिण्याचा मी प्रयत्न करत आहे. आजकाल सर्वत्र भारतीय सण आणि उत्सव यांची सांगड पर्यावरण प्रदूषणाबरोबर लावली जाते. एक गट आपल्या समाजात पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्नशील असतो तर दुसरा गट या गोष्टीला टाळून उत्सवाची पारंपरिकता जपत फक्त सण साजरे करण्यावर भर देताना दिसून येतो. कोण चूक आणि कोण बरोबर असं भेद करण्यात काहीच अर्थ नाही कारण काही थोड्या बहुत मुदयांवर दोन्ही गट बरोबर असतात आणि काही बाबी बद्दल दोन्ही गटातील मंडळी चुकीची असतात. तर मग काय आहे ही गंमत-गोष्ट मी तुम्हाला आज काही संदर्भ ग्रन्थ आणि शोधपत्रिके च्या वरून स्पष्ट करण्याचा आपण येथे प्रयत्न करू या. उत्सव मानवी जीवनात