संवर्धणाची भाषा
शाळेत शिकत होत मी
अ, आ आणि आई
वेळ बदलला काळ लोटला
लागली सर्वांना विकासाची घाई II१II
लहान होतो तेव्हा चंद्र होता
मामा
आणि चिव चिव करणारी चिउताई
आता मोठा झालो मी फार
तेव्हा समजले चंद्र तर अप्रकाशित दगडी भार II२II
जोतिबा आणि सावित्री ने
ज्ञान गंगोत्रि दावली
शिक्षणाची दारे सारी गावोगावी उघडली
आता आले आहेत थ्रिजी आणि फोरजी
मुल आणि पाल्य सर्व त्याच्यातचं बिजी II३II
‘भाषा’ असते अभिव्यक्तीसाठी हे तर सर्वजण विसरलेत
माझ्या भारत भूमीत सर्व चौकटीत डांबलेत
ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेंट
चेंज ची सर्वत्र चर्चा सत्रे
गावचा खेडूत आजही येथे देवराई च्या विचार
गात्रेत
II४II
आमची म्हातारी आज ही शेतात
देशी बियाणे जपते
नको संकर पर बियांचं म्हणून मातीत ती खपते
नाही भाषा त्यांना अवगत
इंग्लंडच्या त्या महाराणीची
परंतु कळते नागपंचमी आणि पोळा ही व्रते चिरंतन
निसर्गाची II५II
अहो साहेब इंग्रजी बीइंग्रजी
ठीक आहे जागतिकी करणासाठी
मर्म मनाचे, भाव सृजनचे ही तर
मातृभाषेतील अभिव्यक्ती
विचार करूया आपण सारे
संवर्धनचि वाट जपताना
कशास यावी भाषेची अडसर जर हृदय सुरांनी छेडताना II६II
कवी - प्रदिप नामदेव चोगले
मोबाईल
– ९०२९१४५१७७
कुलाबा
मुंबई ०५
कवितेचा भावार्थ
:-
आज सर्वत्र आधुनिक शिक्षणा मुळे संवर्धणा ची चळवळ जोर धरत आहे, परंतु या इंग्रजी पाश्चिमात्य भाषेमध्ये (विचारा) सर्वच गोष्टी आज
अडकल्या गेल्या आहेत. गावातील खेडूत माणसाला जरी ही भाषा अवगत नसली तरी संवर्धणा
ची गोम काय हे त्याला समजते. भाषेची अडसर न ठेवता स्थानिक भाषेत जर विचार मांडले
तर संवर्धण जोर धरू लागेल ही बाब या कवितेतून कवि ने मांडली आहे.
POEM //
Theme :- Languages // language of conservation
Comments
Post a Comment