सागरी मत्स्य संपत्तिची वामन कथा - भाग १ भारतीय संस्कृतीत प्रसिद्ध असलेली दशावतार संकल्पना आणि कथा माहीत नसेल असे व्यक्तिमत्व कोणी अभावानेच असेल. या दशावतारात एक अवतार फार लोभस आहे पण जेव्हा ते आपली परिसीमा गाठते तेव्हा त्याची व्याप्ती मात्र अमर्याद होत जाते. वामन अवतार म्हणजे वरकरणी पाहता एक छोटं बालक रूप पण जेव्हा हाच वामन रूप धारी भगवंत बळी राजाकडे तीन पाऊले जमीन मागतो तेव्हा सुरवातीला नाजूक आणि इवलेसे भासणारी पाऊले तिन्ही लोक व्यापतात. पाचवे अवतार बळीच्या द्वाराला जासी भिक्षे स्थळ मागुनी बळीला पाताळी नेसी आरती गाताना आपण हे पद नेहमी गातो परंतु या अवताराची तशी सर्वसामान्य जनमानसात प्रसिद्धी नाही. असो या लेखाच्या माध्यमांतून मत्सव्यवस्थापन आणि नियोजन शाखेतील एक व्यापक शास्त्रीय गोष्ट आपणांस समजावून सांगताना या वामन रुपाची कृतज्ञता पूर्वक आठवण करणे इथे खूप उपयुक्त आहे. ज्याप्रमाणे सुरवातीला खूप लहान भासणारी तीन वामन पाऊले संपूर्ण विश्व व्यापतात अगदी त्याच प्रमाणे काही गोष्टी या सुरवातीला फार शुल्लक आणि छोट्या वाटल्या तरी काही कालावधीनंतर त्या
Posts
Showing posts from June, 2020
- Get link
- Other Apps
नाविण्यपूर्णतेचा ध्यास ‘ चिरंतन महासागर ‘ जपण्यासाठी विकासाच्या वाटेवर चालत असताना मानवी समाज नेहमी खूप मोठ्या जलस्त्रोता काठी स्थिरवलेला दिसून येतो. मग कधी ही मानवी सभ्यता मोठ्या नदी किनारी विकसित होते तर कधी मोठी शहरे ही समुद्र किनारी विस्तारलेली दिसतात. ठिकाण नदी असो ओढा असो की खाडी वा समुद्र किनारा ‘पाणी’ ही अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे ज्या भोवती आपले वाड-वडील, आपण आणि आपली येणारी पिढी वास्तव्य करणार आहे. मानवी शरीर असो की इतर कोणी सजीव पेशी साधारण ६०-८०% ही पाण्याने व्याप्त असते; प्रमाणात पेशी आणि प्रजाती प्रकारानुसार फरक दिसून येतो परंतु ‘पाणी’ हा घटक खूपच महत्वपूर्ण हे काही कोणाला नाकारता येणार नाही. शाळेत प्रवेश केल्यावर तिसरी किंवा चौथी ला आपण एक महत्वपूर्ण गोष्ट विज्ञान आणि भूगोलाचा अभ्यास करताना शिकतो ती म्हणजे ‘जलचक्र’ अर्थात जमिनीवर असलेल्या पाण्याची उष्णतेने वाफ होते ही वाफ थंड झाली की त्याचे ढग बनवतात, ढग थंड होऊन जेव्हा जड होतात तेव्हा पाऊस पडतो. शाळेत शिकत असताना आपण एक इयत्ता पास होतो आणि पुढच्या वर्गात सरकत असतो. जलचक्र आणि समुद्र मग आपल्या अभ्यासा