माझ्या कविता
प्रस्तावना: - वाचक दोस्तहो आपल्या अवती-भवती सर्वत्र सध्या विकास कामांचा धुडगूस चालू आहे. शहर स्मार्ट आणि गावे मॉर्डन होत आहेत. परंतु यात आपण जाणीवपूर्वक रीत्या गाणारे पक्षी, भिरभिरणारी फुलपाखरे, पावसातील चिखल-मातीचा सुवास यांना दूर सारत आहोत. माझी सदर कविता 'गुलमोहर टेकडी' हि या बद्दल माझा अनुभव मांडत आहे. मला नक्कीच जाणीव आहे आपला हि असाच काहीसा वर्तमान अनुभव असेल......... गुलमोहर टेकडी काळ्या चकचकीत डांबरी सडकेवर आजकाल दुपार फार असह्य होते I निदान ते तरी बरं कारण शहरातील तो गुळगुळीत क्राक्रीट रोड तुलनेने अधिक आग ओकत असतो II १ II रामवाडीची ती गुलमोहर टेकडी आजकाल गुलमोहरी ला मुकली आहे I कारण रुंदावणारा मुबंई-अलिबाग महामार्ग तिला सतत मागे सारत आहे II२II उन्हात सावली मला, तिला आणि त्याला साऱ्यांना हवीहवीशी वाटते I पण तिची निर्मिती करणारी वृक्षराजी आम्हाला आजकाल अडचणीची ठरते II३II कोकीळ आता कधी तरीच कुहुकुहू करते, कारण किनारी असलेली अंबराई आता तिथे नाही I नाही तिथे उरली आहेत ती चिमुकली पाणवठे नाही खळखळणार ओढा II४II चित्र फ...