परशुरामाची भूमी आणि कासव संवर्धनाची विकास गाथा हि गोष्ट तेव्हा सुरु होते जेव्हा मी सप्टेंबर २०१९ मध्ये माझ्या दोन वर्षाच्या संशोधन भूमिकेतून बाहेर पडलो होतो आणि घरी असलेल्या पारंपारिक मासेमारी व्यवसायाकडे वळायचं ठरवलं. पण म्हणतात ना कि काही गोष्टी या आपल्या साठी जणू परमेश्वरी योजना म्हणून आखून ठेवल्या असतात आणि ते आपल्या सोबत घडायला लागतं आपल्या कल्पनेपलीकडे. काही दिवस मुंबई च्या समुद्री किनारी मासेमारी आणि भटकंती करून झाले होते आणि एक दिवशी एक ईमेल माझ्या मेल बॉक्स मध्ये पडतो. काय आपल्या समुद्री कासव संशोधनात सहभागी व्हायची इच्छा आहे? काय आपण यासाठी काम करू इच्छित आहात? वेळ न दवडता माझ्या मनाने उत्तर दिलं हो, मला यांसाठी जायला हवं. या संशोधनाचं केंद्र होत परशुरामाची भूमी 'कोकण' चा सागरी किनारा. मी याला माझा होकार दर्शक ईमेल पाठवलं आणि काही दिवसात माझी या संशोधन गटात निवड झाली. दि ३१/१०/२०१९ ला रात्री च्या वेळी लाल परीने माझा प्रवास मुंबई सेंट्रल स्थानकातून सुरु झाला. मुंबई-दापोली- हर्णे- पाजपंढरी-आंजर्ले असा होता माझ्या प्रवासाचा क्रम. अंधारात सुरु झालेला प्
Posts
Showing posts from May, 2020
- Get link
- Other Apps
https://youtu.be/DSJCRfsHlws आणि अचानक कधी ओलावा अंतरीचा शाल त्याला स्मितहास्याची कधी उदास बेभान वारा जाणीव त्याला बोचऱ्या एकटेपणाची II१II कधी पवित्र, पुण्य आणि पावन जशी भूपाळी वासुदेवाची कधी सुरेल पण कारुण्य आणि उद्ववगणीत सिद्धार्थ गौतमाची II२II केव्हातरी अचानक अलगद आता मला भास होतात जागेपणातही आता स्वप्नाच्या गावी जातात II३II जिंकायची वा हरण्याची आशा कधी मणी न होती खेळण्याची प्रवृत्ती मात्र अविरत श्वासात होती II४II काही गोष्टी सुरु होतात शेवट करून घेण्यासाठी कधीतरी मात्र शेवट ठरतो गोड सुरवात करण्यासाठी II५II मी काही आता अजून पुरा संपलो नाही गाण्यासाठी मात्र हे गीत आता स्वतःचाही उरलो नाही II६II कवी :- प्रदिप नामदेव चोगले pradipnc93@gmail.com ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ दि २०/१२/२०१४ मध्ये मी या कवीतेची रचना केली होती. मुंबई मध्ये स्थित विज्ञान संस्था इथे शिकत असताना ज
- Get link
- Other Apps
चक्रम वर्ष संपल, वर्ष चालू झालं जाणीव झाली परीक्षा पुन्हा आली रात्री नंतर दिवस येतो दिवसांतर रात्र येते II १ II दिन रात्रीच्या चक्रात आयुष्याची पुन्हा एक पहाट होते माणूस म्हणून जगण्यासाठी सैताना बरोबर हार होते II२II करामध्ये जोर नाही आणि उरामध्ये धीर नाही आयुष्याच्या या नव्या खेळीमध्ये ना नवा उत्साह, ना नवा श्वास नाही II३II पैलतीरि उभा हा पाडुरंग त्याला आता वारकऱ्याची साथ नाही आजकाल तर सारे नवरात्रीत असतात आयुष्याच्या पेटलेल्या वणव्यात असतात II४II कसं आहे म्हटल्यावर बरं असं उत्तर आहे खरं नाही परंतु बोलण्याची ही तऱ्हा आहे माणूस म्हणून जगणे म्हणजे आता ब्रँडवॉर आहे आयुष्यात आता पैरो के लिए पेरॉगोन आहे II५II आहे-आहे आणि नाही-नाही या कवितेचा हा फॉर्म आहे आयुष्य या पेक्षा काही वेगळं नाही आता सारे आहे आणि उद्या काही नाही आहे करून घे मित्रा उल्हास आणि आनंद कारण बापा नंतर पोरा तुझा पहिला नंबर आहे II६II कवी:- प्रदिप नामदेव चोगले pradipnc93@gmail.com -------------
- Get link
- Other Apps
बुद्ध पौर्णिमा आणि मी आजचा दिवस खूप खास आहे माझ्यासाठी कारण हाच तो दिवस आहे ज्या दिवशी माझ्या जीवनाला कलाटणी घडणाऱ्या घटना भगवान बुद्ध यांच्या प्रेरणेने घडल्या. या जगात कुठल्याच महापुरुषाच्या जीवनात इतका अद्भुत योगायोग नाही घडला असेल. याची विशेषता म्हणजे याच दिवशी भगवान बुद्ध याचा जन्म झाला याच दिवशी त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि याच दिवशी त्यांनी महापरिनिर्वाण स्वीकारलं. खरंतर माझी इतकी योग्यता नाही कि मी या प्रचंड चुंबकीय व्यक्तिमत्वाबद्दल काही लिहलं वा बोललं पाहिजे परंतु कृतज्ञता बुद्धीने मी हे करत आहे. आज माझ्या जीवनाला जो आकार प्राप्त झाला आहे त्याला मोठ्या प्रमाणात बुद्ध चरित्राचं वाचन कारणीभूत आहे. योग्य पुस्तक योग्य वेळी जर आपल्या हाती पडलं तर जीवनाची दिशा बदलू शकते याचा प्रत्यय मी स्वतः घेतला आहे. हि गोष्ट आहे साल १९९८ ची जेव्हा मी इयत्ता ३ री मध्ये शिकत होतो. माझ्या शाळेचं नाव कुलाबा महानगर पालिका मराठी शाळा क्रमांक ३. निमित्त होत बुद्ध पौर्णिमे च्या निमित्ताने शाळेत वक्तृत्व स्पर्धा आणि मी त्यात भाग घेतला होता विषय होता 'माझी शाळा'. स्पर्धा संपली आणि