Posts

Image
जेव्हा पक्षी गाणं गाणे बंद करतात- १ दोस्तांनो आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे एक दन्त कथा. अहो दन्त कथा म्हणजे तुम्हाला माहित असेलच कि हि अशी गोष्ट असते जी एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे सांगितली जाते. परंतु आज मी जी तुम्हाला कथा सांगणार आहे ती खूप खास आहे कारण ही अशी दन्त कथा आहे जी अजून घडली नाही तर ती भविष्यातील कथा आहे. हि अशी गोष्ट आहे जी जरी मी एखाद्या जादूगाराप्रमाणे काही दशक आधीच सांगणार आहे. ही गोष्ट आहे तुम्हा सर्वांची माझी आणि आपल्या सर्वांची.   एक खूप सुंदर गाव असतं, खूपच सुंदर निसर्ग वैभवाने नटलेलं जेथे सुंदर पक्षी रोज गाणी गात असतात खुप गोडं गाणी. वर्षभरात बदलणाऱ्या ऋतू प्रमाणे कधी वसंता च्या अगमना बरोबर तर कधी शिशीर च्या बदलणाऱ्या रंगांबरोबर. जिथे शुभ्र धवल निर्झर खळखळ वाहताना गावाला सुजलाम सुफलाम बनवत असतात. लहान मुलं जिथे सकाळी फुलपाखरं आणि बेडूक यांच्या तालात खेळ खेळतात आणि रात्री टीम-टीमणाऱ्या काजवांच्या प्रकाशात आजी आजोबा सोबत त्यागी वीर पुरुषांच्या गोष्टी ऐकत झोपी जातात. सुपीक काळी माती जेथे सर्वांचे पोषण करत असते. सर्वच कसं अगदी आनंदी आनंद असतो. परं...

संवर्धणाची भाषा

Image
  कवितेचा  भावार्थ  :-  आज सर्वत्र आधुनिक शिक्षणा मुळे संवर्धणा ची चळवळ जोर धरत आहे ,  परंतु या इंग्रजी पाश्चिमात्य भाषेमध्ये (विचारा) सर्वच गोष्टी आज अडकल्या गेल्या आहेत. गावातील खेडूत माणसाला जरी ही भाषा अवगत नसली तरी संवर्धणा ची गोम काय हे त्याला समजते. भाषेची अडसर न ठेवता स्थानिक भाषेत जर विचार मांडले तर संवर्धण जोर धरू लागेल ही बाब या कवितेतून कवि ने मांडली आहे. POEM // Theme :- Languages // language of conservation कवी - प्रदिप नामदेव चोगले मोबाईल – ९०२९१४५१७७ ई-मेल –  pradipnc93@gmail.com कुलाबा मुंबई ०५
संवर्धणाची भाषा शाळेत शिकत होत मी   अ , आ आणि आई वेळ बदलला काळ लोटला   लागली सर्वांना विकासाची घाई II १ II लहान होतो तेव्हा चंद्र होता मामा   आणि चिव चिव करणारी चिउताई आता मोठा झालो मी फार   तेव्हा समजले चंद्र तर अप्रकाशित दगडी भार II २ II जोतिबा आणि सावित्री ने ज्ञान गंगोत्रि दावली   शिक्षणाची दारे सारी गावोगावी उघडली आता आले आहेत थ्रिजी आणि फोरजी   मुल आणि पाल्य सर्व त्याच्यातचं बिजी II ३ II ‘ भाषा ’ असते अभिव्यक्तीसाठी हे तर सर्वजण विसरलेत   माझ्या भारत भूमीत सर्व चौकटी त डांबलेत ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेंट चेंज ची सर्वत्र चर्चा सत्रे   गावचा खेडूत आजही येथे देवराई च्या विचार गात्रेत II ४ II आमची म्हातारी आज ही शेतात देशी बियाणे जपते   नको संकर पर बियांचं म्हणून मातीत ती खपते नाही भाषा त्यांना अवगत इंग्लंडच्या त्या महाराणीची   परंतु कळते नागपंचमी आणि पोळा ही व्रते चिरंतन निसर्गाची II ५ II अहो साहेब इंग्रजी बीइंग्रजी ठीक आहे जागतिकी करणासाठी    म...
Image
     कोंबडी आधी कि अंड आधी - कोडं जीवनिर्मितिचं शाळेत जायला लागल्या पासून एक कोडं आपल्याला नेहमीच विचारलं असेल "पहिलं काय आलं? कोंबडी कि अंडा?" आणि नेहमीच आपण या प्रश्नांची बरेच उत्तर ऐकली असतील. कोणी म्हणेल कि कोंबडी तर कोणी म्हणेल कि नाही अंड पाहिलं आला असेल. उत्तर काही असो त्या प्रत्येक उत्तराला पुन्हा तोच उलटा प्रश्न कि कोंबडी आधी अली असेल तर मग ती तर अंडयातून येते आणि जर अंड पाहिलं असेल तर ते अंड तर कोंबडी देते. बालपणी हा प्रश्न गंमतीचा असेल वा काही जणांसाठी हाच प्रश्न कुतूहलाचा असेल पण खरंच हा प्रश्न विज्ञानाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे.    तर सर्वंना नमस्कार, मी तुमचा दोस्त प्रदिप नामदेव चोगले पुन्हा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी आणखी एक नवीन लेख.  मागील लेख आणि त्या लेखावर आधारित माझं युट्युब चॅनल वर आपण वाचलं असेल वा पाहिलं असेल की प्रसिद्ध पुस्तक 'लाईफ ऑन अर्थ' मधील पाहिलं प्रकरण ज्यात आपण जीवसृष्टीतील प्रचंड जीव विविधता आणि उत्क्रांती याची तोंडओळख करून घेतली या लेख मध्ये आपण एका मूलभूत प्रश्नाला समजून घेऊ तो म्हणजे ही विविधता ...
Image
'लाईफ ऑन अर्थ' एक पुस्तक परिचय  -  भाग १   खूप दिवसांनी पुन्हा मी प्रदिप नामदेव चोगले घेऊन आलो आहे हा एक आणखी छान लेख तुमच्यासाठी ज्यात आपण समजून घेणार आहोत एका मस्त पुस्तकाला. लाईफ ऑन अर्थ हे मूळ इंग्रजी पुस्तक आहे ज्याचं लेखन केल आहे सर डेव्हिड आटेबरो यांनी ज्याला प्रकाशित केला आहे बुक क्लब असोसिएट लंडन यांनी. नुकतंच आपण या या नावाची २ री मालिका डिस्कव्हरी आणि नॅशनल जिओग्राफी वर पहिली असेल. हे पुस्तक म्हणजे या मालिकेची १ भाग आहे. सदर पुस्तकात सुरवातीला लेखक महोदयांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे त्या नंतर एकूण १३ प्रकरण आहेत. या सदर लेखात आपण याची तोंड ओळख करून घेणार आहोत.   लेखक जेव्हा दक्षिण आफ्रिका च्या विमानतळावर उतरतो तेव्हा तेथील वृतीय सजीव सृष्टी पाहून स्तंभित होतात. शालेय अभ्यासक्रमात आपण कर्कवृत आणि मकरवृत याचं बद्दल वाचलं असलं. वृतीय भागात असलेलं हवेतला दमट पणा आणि घाम यांनी ते न्हाऊन जातात परंतु, जेव्हा नानाविधी वनस्पती आणि प्राणी पक्षी पाहून ते सुखावतात. या पुस्तकातील पहिलं प्रकरण आहे अनंत जैवविविधता बद्दल ज्याची सुरवात होते महान जीवव...
Image
सागर कथा~ मैफिल समाज रचनेची आणि मासेमारी   दि ३१/१०/२०१९ पासून माझा प्रवास सुरु झाला. रात्री ०९ वाजता मुबंई-चिपळूण गाडीने याची सुरुवात झाली. उलघडायचं होत सुंदर कोकण आणि तेथील लोक जीवन. सुंदर स्वच्छ समुद्री किनारे, भरभरून पसरलेला निसर्ग यांच्या सोबत होणारी मासेमारी आणि इतर सागरी दुवे यांचा अभ्यास करण्यासाठी मी हि मुसाफिरी करत होतो. यातील एक पैलु म्हणजे इकडचं समाज जीवन जवळून अनुभवणे.   १० दिवसा पूर्वीचं महाराष्ट्रात आमदारकीच्या निवडणुका पार पडल्या होत्या सर्वत्र जात आणि धर्म या आधारावर माणूस रंगा मध्ये विभागला होता. कुठे भगवा रंग अधिक भरून होता तरी कुठे निळा रंग विखुरला होता मध्येच एखादी हिरवी छटा दिसून येत होती. थोडं वाईट वाटलं की अजून हि या एवढ्या मोठ्या लोकशाही देशात जात आणि धर्म यांमध्ये होता. असो निवडणुका आल्या आणि गेल्या परंतु जी गोष्ट मुबंई नगरीत मनाला त्रास  देत होती इथे कोकणात मात्र या बद्दल परिस्थिती वेगळी होती. प्रवासाच्या सुरवातीपासून अगदी चिपळूण ला उतरेपर्यंत या भेदाभेदाच्या सीमा विरघळून जात होत्या. मुबंई-गोवा महामार्ग म्हणजे प्रचंड खडे आणि धूळ...
Image
    अनुभूती अद्भुत सृजनाची - कैलास मंदिर आणि औरंगाबाद   काही गोष्टी अश्या असतात ज्या बद्दल आपण कितीही बोललो तरी अनुभवाशिवाय ती गोष्टी कशी हि समजू शकतच नाही. असा एक अनुभव 'याची देही याची डोळा' वेरूळ ची जैन लेणी आणि कैलास मंदिर पाहणे. खूप वेळा काही गोष्टी आपण न ठरवता अनुभवतो तसाच हा प्रवास अनुभव. साधारण वर्षभर काम केल्याचा क्षीण कमी करण्यासाठी आणि मैत्रीची गोडी वाढवणायासाठी केलेला सुंदर प्रवास.   शुक्रवारी कामाचे तास संपून रात्रीच जेवण उरकल्यावर आम्ही सर्व दोस्त एक खाजगी गाडी करून औरंगाबाद साठी मार्गस्थ झालो.  आठ तास लागतील असा अंदाज होता परंतु मुबंई पासून सुरु झालेला पाऊस आणि खराब रस्ता या कारणाने हा प्रवास १२ तास खर्च करून पूर्ण केला. सकाळची पोटपुजा करून तडक दौलताबाद चा किल्ला गाठला. १२ व्या शतकात बांधलेला हा एक अजस्त्र किल्ला यादव राजवटीची याद ताजी करतो. यादव राजवटीतील भिल्लमा-२ पासून सुरु झालेला प्रवास १५ व्या शतकापर्यंत विजापूरच्या आदिलशाही पर्यंत पोहचतो. पुढे १७ शतक उजडेपर्यंत मुघल बादशहा  औरंगजेब चे वास्तव देखील अनुभवणारी हि वास्तू. १९५१ मध्ये...